JOIN US
मराठी बातम्या / Viral / ना पासपोर्ट, ना बंदोबस्त, नदी ओलांडली की परदेशात, भारताच्या सीमेवर कुठे आहे हा प्रकार

ना पासपोर्ट, ना बंदोबस्त, नदी ओलांडली की परदेशात, भारताच्या सीमेवर कुठे आहे हा प्रकार

भारत आणि नेपाळ हे दोन वेगवेगळे देश असले तरी या देशांमधील संबंध नेहमीच एकाच देशासारखे राहिले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मंशु जोशी (पिथौरागढ), 16 एप्रिल 2023 : भारत आणि नेपाळ हे दोन वेगवेगळे देश असले तरी या देशांमधील संबंध नेहमीच एकाच देशासारखे राहिले आहेत. यामुळेच उत्तराखंडच्या सीमावर्ती भागात दोन्ही देशांचे नागरिक शतकानुशतके नातेसंबंधांनी बांधले गेले आहेत. पण कोरोनाच्या संकटानंतर पिथौरागढमध्ये हे बंध थोडे कमकुवत झाले आहेत कारण येथे प्रवास करण्याचे पर्याय शिल्लक राहिले नाहीत. कोरोनानंतर दोन देशांच्या सिमेवरील संबंध कमी झाले आहेत. यामुळे या गावात उदरनिर्वाह करण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारताची उत्तराखंडमधील 275 किमी सीमा नेपाळला लागून आहे. या सीमेवर काली नदी दोन्ही देशांना विभागते. परंतु या नदीच्या अलिकडे आणि पलिकडे दोन गावांमध्ये नात्यात रुपांतर आहे. लग्न असो किंवा सण, दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. पण कोरोना संकटानंतर पिथौरागढच्या हलदू खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये अंतर पडले आहे. भारत आणि नेपाळमधील लोकांच्या ये-जा करण्यासाठी येथे एक बोट चालत असे, मात्र गेल्या तीन वर्षांपासून या बोटीचे काम बंद पडल्याने सीमेवरील लोकांची येजा थांबली आहे.

अरेच्चा! हे काय? तरुणीसोबत चक्क 3 मांजरीनं खेळलं बॅडमिंटन, खेळण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल, VIDEO

संबंधित बातम्या

स्थानिक रहिवासी राजेंद्र भट्ट यांचे म्हणणे आहे की, बोटी न चालवल्यामुळे दोन्ही देशातील लोक एकमेकांसोबत उत्सव साजरा करू शकत नाहीत. येथून लवकर बोट चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बोटीने हलदू खोऱ्यातील भारत आणि नेपाळमधील दोन डझनहून अधिक गावे जोडली होती. 90 किलोमीटरच्या अंतरात वाहतुकीचे कोणतेही कायदेशीर मार्ग नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जाहिरात

या सीमेवर झुलाघाटानंतर टनकपूर येथे 90 किलोमीटर अंतरावर आंतरराष्ट्रीय पूल आहे. अशा स्थितीत दोन्ही देशातील नागरिकांच्या येजा करण्याचे एकमेव साधन म्हणजे बोट होते. परंतु कोरोनानंतर ही बोट बंद पडली. सध्या नेपाळ सरकारने बोट पुन्हा सुरू करण्याचे आधीच मान्य केले आहे, परंतु भारताकडून अद्यापही बोट  सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही.

पिथौरागढच्या जिल्हादंडाधिकारी रीना जोशी यांना या समस्येची माहिती दिली असता त्यांनी येथे पुन्हा बोट सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही देशांतील नागरिकांना ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर बोट सुरू करण्यास आपले प्राधान्य असेल, असे त्या म्हणाल्या.

जाहिरात
हत्तीचं पिल्लू खड्ड्यात अडकलं, लोकांनी असा वाचवला जीव, Video व्हायरल

उत्तराखंडमध्ये नेपाळला लागून असलेल्या सीमेवर दोन्ही देशांदरम्यान वाहतुकीसाठी 12 पूल आहेत, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील 10 पूल झुलाघाटपासून तवाघाट सीमेकडे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या