नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येत मोठी वाढ झाली. यात अनेक सर्वसामान्यांची फसवणुकही झाली. हेच पाहता Insurance Regulatory and Development Authority अर्थात इरडाने (IRDAI) सायबर इन्शोरन्स (Cyber Insurance) कव्हर वाढवला आहे. इरडाने सायबर इन्शोरन्स अंतर्गत कव्हर होणाऱ्या गोष्टी पूर्णपणे स्पष्ट केल्या आहेत. IRDAI ने इन्शोरन्स कंपन्यांना सायबर फसवणूक, अनधिकृत व्यवहार, ईमेल स्पूफिंगमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध कव्हर देण्याबाबत सांगण्यात आलं आहे. IRDAI ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर इन्शोरन्स कव्हर वाढवला जाईल. ज्यात कंपन्या सायबर इन्शोरन्स पॉलिसी अधिक सोप्या करतील. कोरोना काळात सायबर फ्रॉडमध्ये (Cyber Fraud) मोठी वाढ झाली आहे. डिजीटल व्यवहारात वाढ झाल्याने सायबर धोके वाढले आहेत.
सायबर इन्शोरन्समध्ये काय कव्हर होणार? - पैसे चोरी नुकसान - अनधिकृत ऑनलाईन व्यवहार - सोशल मीडियाद्वारे थर्ड पार्टी नुकसान - ईमेल स्पूफिंग - फिशिंग अटॅक नुकसान भरपाई - सायबर एक्सटॉर्शन कव्हर - डेटा ब्रीच आणि प्रायव्हसी ब्रीच कव्हर
सायबर इन्शोरन्स क्लेम रिजेक्ट होण्याबाबतही IRDAI कडून निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, सायबर फ्रॉड झाल्याच्या 24 तासांच्या आता कार्ड ब्लॉक न केल्यास क्लेम रिजेक्ट केला जाईल. बँकेतून SMS आणि OTP साठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी नसल्यासही सायबर इन्शोरन्स क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.