कोणत्याही स्मार्टफोनची स्क्रीन बदलणं खूप महागडं ठरतं. यासोबतच आजकाल फोनमध्ये बरीच महत्त्वाची माहिती असते. अशा वेळी फोन सर्व्हिस सेंटवर रिपेयरिंगला टाकणं खूप कठीण असतं. म्हणूनच लोक त्यांच्या फोनवर स्क्रीन लावतात. पण, आजकाल नवीन स्मार्टफोनमध्ये याची गरज आहे का? याविषयी जाणून घेऊया.
काही वर्षांपूर्वी जवळजवळ सर्व लोक त्यांच्या फोनवर स्क्रीन लावायचे. आजही हा ट्रेंड बर्याच प्रमाणात सुरू आहे. पण, बदलत्या काळात फोनच्या स्क्रीनमध्ये अतिशय मजबूत काचेचा वापर केला जात आहे. मग तो अँड्रॉइड फोन्सचा गोरिल्ला ग्लास असो किंवा आयफोनमध्ये वापरलेला सिरॅमिक शील्ड ग्लास असो. हे दोन्ही खूप मजबूत आहेत.
केवळ खनिजेच या ग्लासेसला स्क्रॅच करू शकतात. तुमच्या खिशातील कारची चावी देखील फोनच्या काचेवर मोठा स्क्रॅच सोडू शकत नाही. नवीन फोनच्या स्क्रीनमधील काच रोजची कामे आरामात हाताळू शकते. त्यात छोटे स्क्रॅच पडू शकतात. पण, दिसतही नाहीत.
स्क्रीन प्रोटेक्टर लावण्याचे काही तोटे देखील आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डिस्प्लेला टच करण्याचा फील बदलतो. ग्लास ऐवजी प्रोटेक्टर लावला तर फील अजूनह बिघडतो. तसेच, स्क्रीनच्या वर लावलेला प्रोटेक्टरमुळे अनेकदा लूक बिघडतो. याशिवाय, ते कालांतराने घाण होऊ लागतात आणि पटकन स्क्रॅच देखील पकडू लागतात. अशा वेळी फोनची इमेज आणि व्हिडिओही क्लियर येत नाहीत.
फोनचे जास्त नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी, स्क्रीनला अॅडिशनल सिक्योरिटी देण्यासाठी आणि अँटी-ग्लेअर पर्याय म्हणून हे चांगले काम करतात. तुम्ही हायकिंग करत असाल किंवा बीचवर जायला आवडत असाल. किंवा बांधकाम साइटवर काम करत असाल. अशा ठिकाणी स्क्रीनवर धोका वाढतो. अशा वेळी स्क्रीन गार्ड गरजेचा असतो.
एकंदर असं आहे की, फोनमध्ये स्क्रीन प्रोटेक्टर बसवणे आता पूर्णपणे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. म्हणजेच स्क्रीन प्रोटेक्टर आता ऑप्शनल झालेय.