Man Udu Udu Jhal: इंद्रा-दीपूची ताटातूट; अखेर देशपांडे सरांसमोर येणार इंद्राची खरी ओळख
मुंबई, 17 जून: झी मराठीवरील ( Zee Marathi) मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) मालिकेत दीपू मोठ्या अपघातातून बाहेर आल्यानंतर तिच्या सुरळीत आयुष्याला सुरुवात झाली. इंद्रा-दीपू ( Indra-Deepu) यांचं प्रेम नव्यानं खुलू लागलं. देशपांडे सर ( Deshpande Sir) स्वत: साळगावकरांच्या घरी दीपूसाठी इंद्राचा हात मागायला जाणार आहेत. त्यासाठी सगळी तयारी देखील त्यांनी केली. सगळं जुळून आलं असताना अखेर इंद्राची खरी ओळख देशपांडे सरांसमोर येणार आहे. इंद्रा बँकेत काम करत नसून तो वसूली करणाऱ्या गुंडाचं काम करतो हे सत्य देशपांडे सरांसमोर उघड होणार आहे. मन उडू उडू झालं मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की, इंद्रा दीपू त्यांचं काम करत असताना तिथे काही गुंड दोघांवर हल्ला करतात. दीपूला वाचवण्यासाठी इंद्रा त्याच्या स्टाइलनं गुंडांशी मारामारी करतो. मात्र तितक्यात तिथे देशपांडे सर येतात. सुरू असलेला सगळा प्रकार ते पाहतात. देशपांडे सर ‘इंद्रा सगळ्यात मोठा गुंड आहे’, अशी वाक्य इंद्राच्याच तोंडून ऐकतात आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. हेही वाचा - अरुंधती घेणार नवी भरारी! इशाच्या नाकावर टिच्चून घेतलं कॉलेजमध्ये अँडमिशन वसूली करणारा गुंड हा इंद्रजीत साळगावकरचं असल्याचं त्यांच्या समोर येतं. ‘हा देशपांडे त्याच्या मुलीचा हात कधीच एका गुंडाच्या हातात देणार नाही’, असं म्हणत दीपूला तिथून घेऊन जातात. या सगळ्या प्रकारानंतर इंद्रा कोसळून घाली पडतो.
मालिकेच्या या नव्या ट्विस्टमुळे इंद्रा दीपूच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा येणार आहे. इंद्राची खरी ओळख देशपांडे सरांसमोर आल्यानं ते इंद्रा-दीपूचं नात कायमचं तोडण्याचा निर्णय घेणार आहेत. इंद्रा-दीपू यांच्या प्रेमाची गाडी पुन्हा रुळावर येत असताना ते पुन्हा एकदा वेगळे होणार आहेत. मालिकेचा प्रोमो पाहून इंद्रा आणि दीपूला मारण्यासाठी गुंड कोणी पाठवले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ती कार्तिक आणि सानिकाची नवी खेळी असणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंद्राच सत्य समोर आल्यानं देशपांडे सर त्याच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडणार आहेत. शिवाय आता इंद्राच्या आईला जयश्रीला देखील इंद्रा गुंड असल्याचं कळणार आहे. त्यामुळे इंद्रासाठी हे सगळं सांभाळणं फार कठीण होणार आहे. इंद्रा देशपांडे सरांना आणि जयश्रीला त्याची बाजू समजावू शकणार का? इंद्राचं प्रेम त्याला परत मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी मालिकेचे पुढील भाग पाहणं महत्त्वाचं ठरेल.