JOIN US
मराठी बातम्या / देश / मी जिवंत परतलो, याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा! पंतप्रधान मोदींचा भटिंडा विमानतळ अधिकाऱ्यांकडे निरोप

मी जिवंत परतलो, याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा! पंतप्रधान मोदींचा भटिंडा विमानतळ अधिकाऱ्यांकडे निरोप

सुरक्षेत कसूर झाल्यानंतर दिल्लीला परतावं लागलेल्या पंतप्रधान मोदींनी येता येता भटिंडा विमानतळावरील कर्मचाऱ्यांना एक निरोप दिला. तो निरोप होता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यासाठी

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भटिंडा, 5 जानेवारी: मी भटिंडा विमानतळावर (Bhatina Airport) जिवंत (Alieve) परत पोहोचू शकलो, याबद्दल मुख्यमंत्र्यांना (Punjab CM Charanjit Channi) धन्यवाद (Thanks) सांगा, असा निरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्याकडे दिल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी (Airport officials) दिली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे त्यांचा ताफा 15 ते 20 मिनिटं एका जागी थांबून होता. त्यानंतर हा दौरा रद्द करून पंतप्रधान मोदींना पुन्हा दिल्लीला परतावं लागलं. त्यावेळी भटिंडा विमानतळावर दाखल झालेल्या पंतप्रधानांनी तिथल्या कर्मचाऱ्याकंडे हा निरोप दिला.

संबंधित बातम्या

काय आहे प्रकरण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी पंजाब दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरक्षेत कसूर झाल्याचं लक्षात आल्यामुळे ते फिरोजपूरला जाऊ शकले नाहीत. याच दरम्यान पंतप्रधान जात असलेल्या मार्गावर काही आदोलकांनी अचानक गर्दी केल्यामुळे त्यांचा ताफा एकाच जागी थांबून राहिला. जवळपास 15 ते 20 मिनिटं हा ताफा एकाच जागी थांबून राहिला. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. या कारणामुळे त्यांचा पूर्ण दौराच रद्द करून पंतप्रधानांना दिल्लीला परत जाण्याची विनंती करण्यात आली. पंतप्रधानांनी दिला निरोप पंतप्रधान मोदी हा दौरा रद्द करून दिल्लीला परत येण्यासाठी भटिंडा विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी बातचित केली. यावेळी आपण विमानतळावर सुरक्षित पोहोचू शकलो, याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या, असा उपरोधिक टोला पंतप्रधानांनी लगावल्याची माहिती विमानतळ कर्मचाऱ्यांनी दिली आहे. हे वाचा- काय सांगता! ‘या’ विद्यापीठात दिलं जातंय Party करण्याचं शिक्षण, प्रवेशासाठी झुंबड केंद्र विरुद्ध राज्य सरकार पंतप्रधानांच्या सुरक्षेत कसूर झाल्याच्या मुद्द्यावरून आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद उभा राहण्याची चिन्हं दिसू लागली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची तयारी केंद्रीय गृह खात्यानं केली आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक आणि त्याला असणारी शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी या दोन्ही बाबींचा विचार करता या घटनेचे मोठे पडसाद नजीकच्या भविष्यात उमटण्याची चिन्हं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या