मुंबई, 17 सप्टेंबर : मुंबईतील आरे वाचवण्यासाठी माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश सरसावलेत. कारशेडसाठी पर्यायी जागा असतानाही सरकारनं प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याची टीका रमेश यांनी केलीय. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेनं यापूर्वीचं विरोध केलाय. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्यावरून भाजपची कोंडी होणार आहे