मुंबई 17 ऑक्टोबर : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर अखेर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये भाजपने आपला उमेदवार मागे घेत माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. Andheri East Bypoll : शिवसेनेच्या वाघिणीने भाजपला दाखवले आस्मान, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया…. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलं, की प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र ! काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.. आपला मित्र, राज ठाकरे’ राज ठाकरेंनी केली होती मागणी - राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना रविवारीच पत्र लिहून आपला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. या पत्रात राज ठाकरेंनी लिहिलं, होतं की ‘रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी; भाजपची माघार माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं.’ यानंतर शरद पवारांनीही पत्र लिहिलं होतं. अशात आता अखेर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून भाजपने घेतलेल्या या निर्णयासाठी त्यांचे आभार मानले आहेत.