मुंबई, 14 फेब्रुवारी : राज्यात मागच्या 4 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मागच्या 24 तासांता सोलापूर जिल्ह्यात 37.2 अंश तापमान नोंदले गेले. तर धुळे जिल्ह्यात रात्री सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात 8 अंश तापमान नोंदवले गेल आहे. दरम्यान राज्यात पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा तर रात्री थंडी अशी परिस्थिती असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील उत्तरेत किमान तापमानात घट कायम आहे. धुळ्यासह निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे किमान तापमान 10 अंशांच्या जवळपास आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानातही घट झाली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
10 Feb: राज्यातील हिवाळ्यातील आणखी एक लहान स्पेल:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 10, 2023
IMD GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, 13-14 फेब्रुवारी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांसह राज्यात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्र काही भागात त्याचा प्रभाव जास्त असेल. pic.twitter.com/WFiVxKo5PN
हे ही वाचा : शहर स्वच्छतेसाठी कोट्यवधींंचा खर्च, सर्वात मोठा तलाव मात्र प्रदूषणाच्या विळख्यात, Video
निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. सांगली, सांताक्रुझ, रत्नागिरी येथे तापमान 36 अंशांपार आहे. विदर्भाच्या कमाल तापमानात घट झाली आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (10.6), जळगाव 33 (10.1), धुळे 32 (8), कोल्हापूर 35 (19), महाबळेश्वर 31.6 (13.4), नाशिक 31.2 (10.9), सांगली 36.1 (17.3), सातारा 35.2 (16.4), सोलापूर 37.2 (16.5), रत्नागिरी 36.4 (21.2), औरंगाबाद 32.2 (10.2), नांदेड (16.2), परभणी 34.4 (13.4), अकोला 35 .2 (12.5), 4.8), ब्रम्हपूरी 33.7 (14.6), चंद्रपूर 31 (11), नागपूर 31.8 (11.7) तापमानाची नोंद झाली.
हे ही वाचा : Nashik : रेल्वे स्टेशनवर मिळणार शुद्ध हवा, पाहा कसं आहे देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर! Video
राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता
राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.