मुंबई : देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवा लाँच करण्यात आली आहे. आता कर्मशियल बेसवर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ १३ शहरातील लोकांना होणार आहे. हळूहळू सगळ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतातील 5G इंटरनेटच्या उद्घाटन सोहळ्यात इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये संबोधित केलं. यादरम्यान, सर्वांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ‘भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून आम्ही जे काही केले त्याचा मला खूप अभिमान आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस आता एशियन मोबाईल कॉंग्रेस, ग्लोबल मोबाईल काँग्रेस बनली पाहिजे.
#5GLaunch | #5GIndia #5GServices #PMModi #5Gnetwork #MukeshAmbani #reliance #5G @narendramodi pic.twitter.com/JfHBpSizEE
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) October 1, 2022
यावेळी बोलताना ते म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत 5G इंटरनेट प्रत्येक शहर, गाव आणि गावात पोहोचेल असा विश्वास त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. याचा फायदा आरोग्य, शिक्षण क्षेत्रात मोठा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (डिस्केलमर: न्यूज18 लोकमत ही रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा एक भाग आहे. नेटवर्क18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची आहे.)