बंगळुरु, 14 एप्रिल : सलग सहा सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अखेर दणक्यात विराटच्या सेनेनं आपला पहिला विजय नोंदवला. या विजयासाठी विराटला चक्क सात सामन्यांची वाट पाहावी लागली.
Virat after winning the first match...#KXIPvRCB pic.twitter.com/uXRr0cAK7k
— Swagat Mishra (@Swag_se_swaagat) April 13, 2019
या विजयाच्या मागे एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकी खेळाचा मोठा हा होता. तर, विराटनं 53 चेंडूत 67 धावा करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. तर एबीनं 59 धावा केल्या. या धावांच्या जोरावर बंगळुरूनं पंजाबच्य संघावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर कोहली आणि त्यांचे चाहते सुखावले असला तरी सोशल मीडियावर त्याची चांगलीच थट्टा उडवली जात आहे. RCBच्या चाहत्यांनी आता सेलिब्रेशन टाईम आहे, असं म्हणत मीम तयार केलं.
तर, दुसरीकडं सलग सहा जिंकल्यानंतर आता एक सामना जिंकून RCB प्ले ऑफमध्ये जाणार आहे का?, असा सवाल चाहते विराटला विचारत आहेत.
RCB finally win a match and still they are at the bottom of the table. #KXIPvRCB pic.twitter.com/KEbuKq3WuO
— Sagar (@sagarcasm) April 13, 2019
काही चाहत्यांनी तर, आम्हाला विश्वास बसत नाही की बंगळुरू सामना जिंकला असं म्हणत ट्रोल केलं आहे.
ऐसा पहिली बार हुआ है, सतरा अठरा सालो में…असा खोटक मेम काही चाहत्यांनी केलं आहे.
RCB registered it's first win in IPL 2019
— Samit سامت (@imssamit) April 13, 2019
Meanwhile kholi & de Villiers right now:-#KXIPvRCB pic.twitter.com/QLusIH1j5t
दरम्यान कोहलीला प्ले ऑफमध्ये आपल्या संघाची जागा करायची असल्यास आता सर्व सामने जिंकणे बंधनकारक आहे. धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं