अरबी समुद्रात उसळलेल्या तौकते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. गोव्यामध्ये या वादळामुळे वीजेचे 700 खांब पडले, तर 200 ते 300 ट्रान्सफॉर्मर्सचं नुकसान झालं.
महाराष्ट्रात कोकणातल्या 6 जणांचा या वादळामुळे मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये अनेक झाडं पडली. गुजरातमधून जवळपास 2 लाख लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
तौकते चक्रीवादळामुळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचंही (Wankhede Stadium) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वादळामुळे स्टेडियमचा एक स्टॅण्ड आणि साइट स्क्रीन पूर्णपणे तुटून मैदानात खाली पडली.
मागच्या 24 तासात भारताच्या मध्य आणि पूर्वोत्तर भागातही वादळामुळे जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात पावसाने दाणादाण उडवून दिली, तर उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.