ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियात हरवणं ही तशी महाकठीण गोष्ट. पण विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया हा पराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
विराटची टीम इंडिया इतिहास घडवणार का, याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे. अंतिम सामन्याआधी खेळाडूंची देहबोली तर सकारात्मक दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं 137 धावांनी विजय मिळवला. भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1नं आघाडी घेतली आहे. (सर्व फोटो सौजन्य: ट्विटर)
मेलबर्नच्या मैदानातील तिसऱ्या आणि 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघानं तुफान सेलिब्रेशन केलं.
विराट म्हणाला की, 'बुमराहची गोलंदाजी पाहता येणाऱ्या काळात जगभरातील फलंदाजांसाठी तो धोकादायक ठरू शकतो.'
'बुमराहच्या अशी गोलंदाजी पाहता मलाही त्याच्या गोलंदाजीवर खेळू वाटत नाही,' असंही विराट कोहली म्हणाला.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक 63 धावा केल्या. तर भारताच्या वतीने बुमराहने सामन्यात 9 गडी बाद केले.
भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत आटोपला.