जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / INDvsNZ : भारत-न्यूझीलंड टॉस दरम्यान घडला अजब प्रकार, कॅप्टन कोहलीच विसरला सर्वात महत्त्वाचं नाव

INDvsNZ : भारत-न्यूझीलंड टॉस दरम्यान घडला अजब प्रकार, कॅप्टन कोहलीच विसरला सर्वात महत्त्वाचं नाव

INDvsNZ : भारत-न्यूझीलंड टॉस दरम्यान घडला अजब प्रकार, कॅप्टन कोहलीच विसरला सर्वात महत्त्वाचं नाव

या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टॉसनंतर एक भलताच प्रकार घडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

ऑकलंड, 24 जानेवारी : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 5 टी-20 सामने खेळे जाणआर आहेत. यातील पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर होत आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टॉसनंतर एक भलताच प्रकार घडला. टॉस जिंकल्यानंतर विराट कोहलीला संघात कोण कोणते खेळाडू आहेत, असे विचारले असता कर्णधार विराट कोहलीला खेळाडूंची नावेच आठवली नाहीत. आजच्या सामन्यात ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, कुलदीप यादव या पाच खेळाडूंना संघात जागा मिळाली नाही आहे. मात्र विराट कोहली खेळाडूंची नावेच विसरल्यानंतर त्याला हसू अनावर झाले.

जाहिरात

खेळपट्टी गोलंदाजीसाठी फायद्याची टॉस दरम्यान जेव्हा प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारले असता ते म्हणाले की खेळत नसलेल्या पाच खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. मी दोन खेळाडूंची नावे विसरलो आहे. मी सांगेन नंतर तथापि, नंतर हे स्पष्ट झाले की ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरही हा सामना खेळत नाहीत. नाणेफेक दरम्यान विराटने सांगितले की ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी उत्तम दिसते. आम्हाला लवकरच नवीन चेंडूसह न्यूझीलंडची सुरुवातीची विकेट घ्यायची आहे, असेही सांगितले. ईडन पार्क मैदानावर पडणार धावांचा पाऊस आतापर्यंत या मैदानावर 19 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाच वेळा 200 पेक्षा जास्त वेळा स्कोअर झाला आहे. याशिवाय दोन्ही खेळींमध्ये फलंदाजीसाठीही या खेळपट्ट्या चांगली आहेत. दरम्यान भारतानं याआधी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वगळता सर्व टी-20 मालिका जिंकल्या आहेत. मात्र भारतासाठी ही मालिका जिंकणे कठिण असणार आहे. सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, असे असले तरी शिखर धवन जखमी असल्यामुळं सलामीला रोहित-विराटची जोडी उतरेल. त्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. भारताचा संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात