भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात तिसऱ्या सामन्यात विराटसेनेनं दणदणीत विजय मिळवला. याआधी मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला होता. त्यानंतर कमबॅक दुसरा आणि तिसरा सामना जिंकत भारतानं ही मालिका आपल्या खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं 119 तर विराट कोहलीनं 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, श्रेयस अय्यरनं 35 चेंडूत 44 धावा करत फिनीशरची भुमिका योग्यपणे निभावली. तत्पूर्वी, प्रथम टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात स्मिथच्या 131 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हरनंतर भारताला 287 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 47.3 ओव्हरमध्ये करत आणखी एक मालिका विजय भारताला मिळवून दिला. भारताने जिंकली सलग 6वी मालिका भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 12 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील 6 मालिका भारतानं तर 6 ऑस्ट्रेलियानं जिंकल्या आहेत. दोघांमध्ये शेवटची मालिका मार्च 2019मध्ये खेळवण्यात आली होती. ही मालिका ऑस्ट्रेलियानं 3-2ने जिंकली होती. दरम्यान यंदा झालेल्या मालिकेत मागच्या पराभवाचा वचपा काढत 2-1ने ही मालिका जिंकली.Delhi: Cricket betting racket busted by Crime Branch; 11 persons arrested, 70 mobile phones, 2 TVs, registers and 7 laptops recovered. Bets worth Rs. 2 crores were placed on yesterday's India-Australia match played at Bengaluru
— ANI (@ANI) January 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket