मुंबई, 28 डिसेंबर : महादेवाच्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरापासून झाली, असे मानले जाते. एक मुखी, दोन मुखी, पाच मुखी असे अनेक प्रकारचे रुद्राक्ष आहेत, यामध्ये पंचमुखी रुद्राक्षाचे विशेष महत्त्व मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे असंख्य फायदे आहेत. रुद्राक्ष धारण करण्याचे कित्येक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. रुद्राक्ष हे सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने महादेवाची कृपा व्यक्तीवर राहते, असे मानले जाते. जाणून घेऊया पंचमुखी रुद्राक्षाचे फायदे आणि ते धारण करण्याची पद्धत. पंचमुखी रुद्राक्षाचे फायदे पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, पंचमुखी रुद्राक्ष हे भगवान शिवाच्या 5 रूपांचे प्रतीक आहे. मानवाचे शरीर अग्नि, जल, वायु, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पंचमुखी रुद्राक्षामुळे व्यक्तीच्या शरीरातील ही पाचही तत्वे नियंत्रणात राहतात. पंचमुखी रुद्राक्ष गुरू ग्रहाचे अशुभ प्रभाव नाहीसे करते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीची एकाग्रता शक्ती वाढते. जीवनात सुख-समृद्धी आल्याने व्यवसायात प्रगती होते. रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. त्यांची प्रकृती उत्तम राहते. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते.
पंचमुखी रुद्राक्ष कसे धारण करावे - ज्योतिषांच्या मते सोमवार किंवा गुरुवारी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. पहाटे उठून आंघोळ करून चौरंगावर लाल कापड अंथरूण शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. यानंतर भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण करावा. पंचमुखी रुद्राक्ष धारण करताना उत्तर दिशेला बसून ॐ हरेम नम: चा जप करावा. रुद्राक्ष पेंडेंटमध्ये घालणे उत्तम मानले जाते. रुद्राक्ष धारण करताना भगवान शंकराचे अखंड ध्यान करावे. हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)