माणूस जगात येतो आणि निघून जातो मात्र जाताना तो त्याच्यासोबत काय नेतो हे तुम्हाला माहितीय का? आचार्य चाणाक्य यांच्या मते माणूस एकटाच जन्म घेऊन जगात येतो. आणि मृत्यूनंतरही एकटाच जातो. आचार्य चाणाक्य यांच्या मते, मेल्यानंतर माणूस एकच गोष्ट सोबत घेऊन जातो ती म्हणजे कर्म. मनुष्य जे काही चांगले वाईट कर्म करतो तो एकटाच अनुभवत असतो. त्यामुळे व्यक्तीला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणूनच म्हणतात व्यक्तीने चांगले कर्म केले पाहिजे.