नॉर्थ कोरिया लागोपाठ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून जगाला धडकी भरवणाऱ्या उत्तर कोरियानंही देशाच्या सीमा बंद ठेवल्यामुळे या देशात कोरोनाचा विषाणू आलेला नाही. केवळ नागरिकच नव्हे, तर अन्न आणि इतर वस्तूंची आयातही उत्तर कोरियानं बंद ठेवली आहे. परिणामी देशाला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला, मात्र तरीही कोरोनाला दूर ठेवण्यात त्यांना यश आलं आहे.