शेफने कोहलीकडे जाऊन त्याला विविध पदार्थांचा समावेश असलेली केरळची शाकाहारी मेजवानी खाण्याचा पर्याय सुचवला. यासाठी कोहली तयार झाला आणि शेफने त्याच्या टीमसोबत त्याच्यासाठी 24 शाकाहारी पदार्थ तयार केले. परंतु यावेळी केवळ एका व्यक्तीसाठी अन्न बनवणे कठीण असल्याने शेफच्या टीमकडून थोडे अधिकचे अन्न बनवले गेले.
हॉटेलमधील लोकांना शिळे अन्न दिले जात नसल्याने उरलेले अन्न फेकून दिले जाईल, असे शेफने सांगितले. तेव्हा 700 रुपये प्रति लीटर दराचे पाणी पिणारा कोहली म्हणाला की, अन्न वाया जाऊ नये म्हणून हेच अन्न मी रात्री ही खाईन. मात्र, हॉटेलचे आणि बीसीसीआयच्या कडक नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला शिळे जेवण देता येत नाही.