त्रिनिदादमध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्मा केवळ 18 धावा करत बाद झाला. सलामीच्या फलंदाजांना या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. धवन 2 धावा करत बाद झाला.
मात्र रोहितनं विराटसोबत अर्धशतकी भागिदारी करत एक नवा विक्रम केला. रोहित-विराटनं सेहवाग आणि सचिन यांच्या जोडीला मागे टाकले आहे. रोहित-विराटनं 74 धावांची भागिदारी केली.
विराट-रोहितनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 32वेळा 50हून अधिक धावांची भागिदारी केली आहे. तर, सचिन आणि सेहवाग यांनी 31वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर आहेत. या दोघांनी 55वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत.
रोहित-विराटच्या जोडीनं धवन आणि रोहितच्या जोडीलाही मागे टाकले आहे. शिखर आणि रोहित यांनी मिळून 4728 धावा केल्या आहेत.
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावांची भागिदारी करण्याचा विक्रमही गांगुल आणि सचिनच्या नावावर आहे. त्यांनी 8227 धावा एकत्र केल्या आहेत.