इशांत शर्मानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. इशांत शर्माच्या या खेळीमुळं वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा बॅकफूटवर गेला.
दरम्यान इशांत शर्माच्या या कामगिरी मागे बुमराहचा सर्वात मोठा हात होता. बुमराहनं शर्माला ‘क्रॉस-सीम’ (Cross Seam) चेंडू टाकण्यास सांगितले.
शर्मानं केवळ 42 धावा देत पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. दरम्यान तब्बल नव्यांदा शर्मानं ही कामगिरी केली.
इशांतनं बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बुमराहचे आभारत मानत, “पावसामुळं चेंडू ओला झाला होता. त्यामुळं क्रॉस-सीम गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि त्याचा फायदा झाला” असे सांगितले.
विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात 297 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 189 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून ईशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सध्या जेसन होल्डर 10 धावांवर खेळत होता. तर मिगुएल कमिन्स त्याच्यासोबत मैदानात होता.