वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल गमावल्यानंतर आता भारतीय टीमसमोर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजचं कठीण आव्हान आहे. या सीरिजमध्ये एकूण 5 सामने होणार आहेत. त्याआधी भारतीय टीमला 20 दिवसांची सुट्टी मिळाली आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू बायो-बबलमधून बाहेर आले आहेत आणि इंग्लंडमध्ये भटकंती करत आहेत.