भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस (24 सप्टेंबर) खास आहे. आजच्याच दिवशी 14 वर्षांपूर्वी टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) जिंकला होता. (फोटो- Twitter/ICC)
वेस्ट इंडिजमध्ये त्याचवर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं (Team India) आव्हान साखळी फेरीतच धक्कादायक रित्या संपुष्टात आलं होतं. या वर्ल्ड कपनंतर काही महिन्यांमध्येच होणाऱ्या या पहिल्या टी20 वर्ल्ड कपसाठी तरुण खेळाडूंची टीम पाठवण्यात आली होती. ( फोटो – Twitter/RP Singh)
वन-डे वर्ल्ड कपमधील धक्कादायक पराभवानंतर क्रिकेटमधील या नव्या प्रकारात टीम इंडियाकडून फारशी कुणालाही अपेक्षा नव्हती. पण, या स्पर्धेत भारतीय टीमनं न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या एकमेव पराभवानंतर चांगली कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. ( फोटो – Twitter/RP Singh)
टीम इंडियासमोर फायनलमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. भारतीय टीमनं लीग मॅचमध्ये पाकिस्तानचा बॉल आऊटमध्ये पराभव केला होता. (फोटो- Twitter/ICC)
फायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. गौतम गंभीरच्या 75 रनमुळे भारतीय टीमनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 157 रन काढले. पाकिस्तानकडून उमर गुलनं 3 विकेट्स घेतल्या. (फोटो- Twitter/ICC)
158 रनचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या ठराविक अंतरानं विकेट्स गेल्या. पण मिसबाह उल हकनं एक बाजू लावून धरली होती. यासिर अराफत आणि सोहेल तन्वीर या तळाच्या बॅट्समननं त्याला साथ दिली. पाकिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 रन हवे होते. (फोटो- Twitter/BCCI)
कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये मास्टरस्ट्रोक खेळत जोगिंदर शर्माच्या हातामध्ये बॉल दिला. मिसाबहनं जोगिंदरच्या दुसऱ्या बॉलवर सिक्स लगावला. पण त्यानंतर पुढच्या बॉलवर आणखी एक सिक्स लगावण्याच्या प्रयत्नात तो श्रीसंतकडं कॅच देऊन आऊट झाला. त्यामुळे भारतीय टीमनं टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं. आता यूएईमध्ये पुढील महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार (T20 World Cup 2021) आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीच्या टीमला पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी आहे. (फोटो – Twitter/Gautam Gambhir)