मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये त्यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. अंनिसने बाबांना त्यांची शक्ती जाहीरपणे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं. तेव्हापासून गदारोळ सुरू आहे.