पण काही भेटवस्तू घरी आणणे शुभ मानले जात नाही. असे म्हणतात की काही भेटवस्तू घरी आणल्याने गरिबी येते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. अशा भेटवस्तूंबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर सांगितले आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून कोणकोणत्या भेटवस्तू आहेत, ज्या घरी आणणे अशुभ मानले जाते.
शिकारी प्राण्यांचा फोटो - वास्तुशास्त्रानुसार सिंह, वाघ, चित्ता इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचे चित्र किंवा मूर्ती देणे आणि घेणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील लोकांमध्ये कलह निर्माण होतो. घरातील सुख-समृद्धी आणि शांती नष्ट होऊ शकते.
मावळत्या सूर्याचा फोटो - वास्तुशास्त्रानुसार, जर कोणी तुम्हाला मावळत्या सूर्याचे चित्र भेट म्हणून दिले असेल तर ते लगेच घराबाहेर काढा, कारण यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
चाकू सारख्या धारदार वस्तू वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चाकू, सुरा किंवा कात्री भेट दिली तर चुकूनही ती स्विकारू नये आणि ताबडतोब परत करावे. कारण यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद वाढू शकतात. यासोबतच आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागते.
वास्तुशास्त्रानुसार, जर कोणी तुम्हाला घड्याळ, रुमाल, बेल्ट, पर्स किंवा चामड्याच्या वस्तू भेट दिल्या तर त्याही स्विकारू नये. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मत्सराची भावना निर्माण होते, त्यामुळे घरात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा भेटवस्तू त्वरित घरातून काढून टाकल्या पाहिजेत. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)