1. कर्जाचे व्यवहार करू नका: शुक्रवार हा धनाची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी कोणाशीही पैशाचे (कर्ज घेणे-देणे) व्यवहार करणे टाळावे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे मानले जाते की, या दिवशी पैसे उधार घेतल्याने किंवा दिल्याने लक्ष्मी देवी कोपते. त्यामुळे संपत्तीची हानी होते. त्यामुळे शुक्रवारी कर्जाचे व्यवहार करू नयेत.
2. कोणालाही साखर देऊ नका : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार शुक्रवारी कोणालाही साखर देऊ नये. असे केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो, असे मानले जाते. यामुळे आपल्या जीवनातील आनंद आणि समृद्धी कमी होते. शुक्र ग्रह कमजोर असेल तर सुख-समृद्धी नष्ट होते. यामुळे घरात गरिबी येते.
3. मद्य आणि मांसाहार करू नका : शुक्रवारी मांसाहार आणि मद्य सेवन करू नये. या दिवशी संपूर्ण सात्विक भोजन करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास शुक्रवारी घरचे सात्विक अन्न खाण्याची सवय लावा. शुक्रवारी मांस आणि मद्य सेवन केल्याने घरात अशांतता येते. त्यामुळे घरात कलह सुरू होतो, असे मानले जाते.
4. अपशब्द वापरणे टाळा: खरंतर कोणीही कधीही वाईट शब्द वापरू नयेत. ते चांगले मानले जात नाही. विशेषत: शुक्रवारी चुकूनही कोणाशी भांडू नये, शिवीगाळ करू नये. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. घरातील सुख आणि संपत्ती नष्ट होते, असे मानले जाते.
5. घर स्वच्छ ठेवा : देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. असे मानले जाते की ज्या घरात घाण असते त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला समर्पित मानला जातो. म्हणूनच या दिवशी घरात विशेष स्वच्छता ठेवा. त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो.