महाराष्टातील तीन क्रमांकाचे सर्वात उंच शिखर म्हणून हरिचंद्रगडाची ओळख आहे. सह्याद्री पर्वत रांगेत अहमदनगरमध्ये घाटमाथ्यावर हे ठिकाण आहे.
सह्याद्रीतील काही अति उंच शिखरे याच प्रदेशात येतात. शिवमंदिर, तारामती आणि बालेकिल्ला आणि विस्तीर्ण पठार असा मिळून हरिश्चंद्रगड आहे.
ऐतिहासिक, नैसर्गिक, अध्यात्मिक आणि मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. या गडाला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाते.
पावसाच्या संततधारेमुळे गडावर धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य अनेकांना भुरळ घालत आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, केदारेश्वराची गुहा, तारामती शिखर, कोकणकडा पुष्करणी कुंड, सात गुहा आदी पर्यटनाची आकर्षण केंद्रं या ठिकाणी आहेत.