महान अर्थतज्ञ चाणक्य यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिल्यास लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल. पैशाची कमतरता भासणार नाही. जाणून घेऊया लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी चाणक्य नीती काय सांगते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जिथे मुर्खांचा आदर नाही, भरपूर अन्नधान्य आहे आणि पती-पत्नीमध्ये मतभेद नाहीत, तिथे लक्ष्मी स्वतः येते. या ठिकाणी नेहमी सुख आणि संपत्ती असते. ते एका श्लोकात असे म्हणतात- मूर्खाः यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितम्। दाम्पत्योः कलहो नास्ति तत्र श्री स्वयमागता॥
अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही - जिथे मुर्खांचा आणि चापलुसी करणाऱ्यांचा आदर केला जातो - चाणक्य नीती दर्पणमध्ये असे म्हटले आहे की, जिथे मूर्खांचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही.
जो मूर्ख माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तो नेहमीच नुकसान सहन करतो. त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, तर मूर्ख आणि चापलूसी करणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मूर्ख आणि चापलूसी करणारे दोघेही योग्य सल्ला देऊ शकत नाहीत.
जिथे अन्नाचे भांडार भरलेले असते: आचार्य चाणक्य यांच्या म्हणीचा अर्थ असा आहे की, जो प्रामाणिकपणे कष्ट करून अन्न, संपत्ती मिळवतो त्याच्या घरी लक्ष्मी वास करते. म्हणून कोणत्याही व्यक्तीने आपल्या कामात कठोर परिश्रम केले पाहिजेत. अशा घरात लक्ष्मी स्वतः येईल.
पती-पत्नीमध्ये कलह- आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या घरात पती-पत्नीमध्ये नेहमी कलह असतो, त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी घरात शांतीचे वातावरण ठेवा. नवरा-बायकोच नाही, घरात कुणाशीही भांडू नका. कलह नसलेल्या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील.