1. सूर्योदयानंतर उठणे: सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यापूर्वी उठणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की, सूर्योदयानंतर उठल्याने घरामध्ये दरिद्रता येते.
2. पाणी वाया जाणे : घरातील नळ किंवा टाकीतून पाणी टपकणे, नाहक पाणी वाहून जाणे, शुभ मानले जात नाही. यामुळे तुम्हाला घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
3. या दिवशी केस कापणे : गुरुवारी आणि एकादशीला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते.
4. खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू: खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नयेत, यामुळे धनहानी होते असे मानले जाते. वेळीच त्या भंगारात घालाव्या.
5. सूर्यास्तानंतर या गोष्टी देऊ नका: सूर्यास्तानंतर दूध, दही किंवा पैसे कोणालाही देणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील धनाची हानी होते, त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
6. खराब चप्पल घरात ठेवणे : तुटलेली चप्पल घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच फाटलेले जुने कपडे घरात ठेवू नका. हे अशुभ मानले जाते. ते एखाद्याला दान करा किंवा त्यांची योग्य विल्हेवाट लावा.
7. धूळ साचणे: धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. घरातील अस्वच्छतेमुळे पैशाची हानी होते. घरातील वस्तूंमध्ये धूळ आणि घाण साचणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात गरिबी येते.
8. पूजा न करणे : हिंदू धर्मात पूजा, जप आणि व्रताचे महत्त्व सांगितले आहे. पण घरात पूजा-व्रत न केल्यास माता लक्ष्मी क्रोधिक होते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे गरिबीला सामोरे जावे लागू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)