कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात व्यक्तीनं चाळीत कांदा युरिया खत टाकल्यामुळे सुमारे 700 पिशव्या कांद्याची नासाडी झाली आहे. (रायचंद शिंदे, जुन्नर)
जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी गणेश विठ्ठल मोरे यांच्या कांदाचाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया खत टाकून कांदा खराब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, हा कांदा पावसामुळे सडत आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतातूर आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला असून पोलिंसात सुद्धा तक्रार करण्यात येणार आहे.