दरम्यान 'लॉकडाऊन (weekend lockdown) किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. राज्यातील अनेक भागात अत्यावश्यक सेवा वगळता दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेनंतरही आज व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं