आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्यांमुळे चिंता वाढली आहे. चहा, कॉफी, अल्कोहोलचं अतिसेवन केल्याने झोपेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. घरबसल्या लोक अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खात आहेत आणि शारीरिक हालचाली मात्र मंदावल्या आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत, असंही डॉ मोमीन यांनी स्पष्ट केलं.