advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याच्या डोळ्या देखत झाला बटाट्याचा चिखल! पाहा हे PHOTOS

सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याच्या डोळ्या देखत झाला बटाट्याचा चिखल! पाहा हे PHOTOS

पाऊस झाल्याने बटाटे वेळेत काढले नाही तर सडून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने बटाटा काढणी सुरू झाली. मात्र, काढनी केलेले बटाटे पावसामुळे शेतात सुडू लागले आहे. (रायचंद शिंदे, प्रतिनिधी)

01
 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार असलेल्या सातगाव पठार भागात मागील 8 दिवस सातत्याने वळवाचा मुसळधार पाऊस होत असून जमिनीत गाळ आणि ओलसरपणा वाढून बटाटा शेतातच सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरूवात केली आहे. मात्र, शेतामध्ये ओलसरपणा वाढल्याने ट्रॅक्टर किंवा बैल जोडीने बटाटे काढता येत नाही. यामुळे मजुरांकडून लाकडी काठीने बटाटे काढावे लागत आहेत त्यामुळे बटाटा काढणी खर्चात मोठी वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार असलेल्या सातगाव पठार भागात मागील 8 दिवस सातत्याने वळवाचा मुसळधार पाऊस होत असून जमिनीत गाळ आणि ओलसरपणा वाढून बटाटा शेतातच सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरूवात केली आहे. मात्र, शेतामध्ये ओलसरपणा वाढल्याने ट्रॅक्टर किंवा बैल जोडीने बटाटे काढता येत नाही. यामुळे मजुरांकडून लाकडी काठीने बटाटे काढावे लागत आहेत त्यामुळे बटाटा काढणी खर्चात मोठी वाढ झाली आहे.

advertisement
02
 सातगाव पठार परिसरात काढणीला आलेला बटाटा आरणीतच बुरशी लागून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात बटाटा विक्री करावा लागत आहे.

सातगाव पठार परिसरात काढणीला आलेला बटाटा आरणीतच बुरशी लागून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात बटाटा विक्री करावा लागत आहे.

advertisement
03
 या भागामध्ये दरवर्षी नगर जिल्ह्यतील अकोले व जुन्नर परीसरातून शेतमजुरांच्या टोळ्या बटाटा काढण्यासाठी येत असतात. पण यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मजूर येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

या भागामध्ये दरवर्षी नगर जिल्ह्यतील अकोले व जुन्नर परीसरातून शेतमजुरांच्या टोळ्या बटाटा काढण्यासाठी येत असतात. पण यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मजूर येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

advertisement
04
 यंदा या परिसरात साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड झाली.आता पीक काढणी योग्य झाले असून पाऊस झाल्याने बटाटे वेळेत काढले नाही तर सडून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने बटाटा काढणी सुरू झाली. मात्र, काढनी केलेले बटाटे पावसामुळे शेतात सुडू लागले आहे.

यंदा या परिसरात साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड झाली.आता पीक काढणी योग्य झाले असून पाऊस झाल्याने बटाटे वेळेत काढले नाही तर सडून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने बटाटा काढणी सुरू झाली. मात्र, काढनी केलेले बटाटे पावसामुळे शेतात सुडू लागले आहे.

advertisement
05
 शेतात गाळ झाल्याने बटाटा काढणी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरने काढणी करता येत नाही. त्यामुळे काढणी खर्चात वाढ झाली आहे. पुरुष मजुरास 250 किंवा 300 रुपये व महिला मजुरास 200 किंवा 250 रुपये व जोडीला 500 किंवा 600 ते 700 रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते.असे एकावेळी मोठ्या शेतकऱ्यांकडे 25 ते 30 मजूर बटाटे काढणीस लागत आहेत.

शेतात गाळ झाल्याने बटाटा काढणी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरने काढणी करता येत नाही. त्यामुळे काढणी खर्चात वाढ झाली आहे. पुरुष मजुरास 250 किंवा 300 रुपये व महिला मजुरास 200 किंवा 250 रुपये व जोडीला 500 किंवा 600 ते 700 रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते.असे एकावेळी मोठ्या शेतकऱ्यांकडे 25 ते 30 मजूर बटाटे काढणीस लागत आहेत.

advertisement
06
 सातगाव पठार भागात प्रत्येक शेतकऱ्याने एक ते 10 एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली. एक एकर बटाटा शेतीला 60 ते 65 हजार खर्च येत आहे. खते, औषधे,मजुरी, फवारणी,बियाणे ,काढणी आदींसाठी मोठा खर्च लागतो.

सातगाव पठार भागात प्रत्येक शेतकऱ्याने एक ते 10 एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली. एक एकर बटाटा शेतीला 60 ते 65 हजार खर्च येत आहे. खते, औषधे,मजुरी, फवारणी,बियाणे ,काढणी आदींसाठी मोठा खर्च लागतो.

advertisement
07
 तर मुंबई ,पुणे येथील मार्केट व खाजगी कंपन्या यांच्याकडून 225 दरम्यान प्रति 10 किलोस बाजारभाव दिला जातो. मात्र, या वर्षी बटाटा पिकाचे गळीत कमी असल्यामुळे हा बाजार भाव सुद्धा शेतकरी वर्गाला परवडत नाही बाजार भावा अभावी येथील शेतकरी अडचणीत आला आहे.

तर मुंबई ,पुणे येथील मार्केट व खाजगी कंपन्या यांच्याकडून 225 दरम्यान प्रति 10 किलोस बाजारभाव दिला जातो. मात्र, या वर्षी बटाटा पिकाचे गळीत कमी असल्यामुळे हा बाजार भाव सुद्धा शेतकरी वर्गाला परवडत नाही बाजार भावा अभावी येथील शेतकरी अडचणीत आला आहे.

advertisement
08
 यावर्षी सुरुवातीला लागवडीच्या वेळी कमी पाऊस झाल्यामुळे बटाटा पिकाला गळीत कमी आहे. कोरोना संसर्गजन्य आजार या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरवली होती. यामुळे बटाटा उत्पादन प्रचंड प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

यावर्षी सुरुवातीला लागवडीच्या वेळी कमी पाऊस झाल्यामुळे बटाटा पिकाला गळीत कमी आहे. कोरोना संसर्गजन्य आजार या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरवली होती. यामुळे बटाटा उत्पादन प्रचंड प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

advertisement
09
 कोरोना यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने जलद बटाटे काढता येतील या आशेवर शेतकरी वर्ग होता पण वळवाच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या सर्व आशा धुळीस मिळवली आहे.

कोरोना यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने जलद बटाटे काढता येतील या आशेवर शेतकरी वर्ग होता पण वळवाच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या सर्व आशा धुळीस मिळवली आहे.

advertisement
10
 दरम्यान सोमवारी दुपारी आंबेगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे.तर येथील बटाटा उत्पादक शेतकरी दिलीप धुमाळ,दिलीप पवळे,विनायक धुमाळ, आदी शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून या पिकाला हमी भाव द्यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान सोमवारी दुपारी आंबेगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी टी.के.चौधरी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे.तर येथील बटाटा उत्पादक शेतकरी दिलीप धुमाळ,दिलीप पवळे,विनायक धुमाळ, आदी शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून या पिकाला हमी भाव द्यावी अशी मागणी केली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2020/09/batta.jpg"></a> पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार असलेल्या सातगाव पठार भागात मागील 8 दिवस सातत्याने वळवाचा मुसळधार पाऊस होत असून जमिनीत गाळ आणि ओलसरपणा वाढून बटाटा शेतातच सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरूवात केली आहे. मात्र, शेतामध्ये ओलसरपणा वाढल्याने ट्रॅक्टर किंवा बैल जोडीने बटाटे काढता येत नाही. यामुळे मजुरांकडून लाकडी काठीने बटाटे काढावे लागत आहेत त्यामुळे बटाटा काढणी खर्चात मोठी वाढ झाली आहे.
    10

    सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याच्या डोळ्या देखत झाला बटाट्याचा चिखल! पाहा हे PHOTOS

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार असलेल्या सातगाव पठार भागात मागील 8 दिवस सातत्याने वळवाचा मुसळधार पाऊस होत असून जमिनीत गाळ आणि ओलसरपणा वाढून बटाटा शेतातच सडू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरूवात केली आहे. मात्र, शेतामध्ये ओलसरपणा वाढल्याने ट्रॅक्टर किंवा बैल जोडीने बटाटे काढता येत नाही. यामुळे मजुरांकडून लाकडी काठीने बटाटे काढावे लागत आहेत त्यामुळे बटाटा काढणी खर्चात मोठी वाढ झाली आहे.

    MORE
    GALLERIES