अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर आरोप केले, अनेकांवर टीका केली, अनेक वादग्रस्त वक्तव्यही तिनं केली. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नव्हे तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनाही तिनं लक्ष्य केलं. मुंबई महापालिकेनं तिचं ऑफिस पाडल्यानंतर तर ती अधिकच संतप्त झाली आणि तिने एकामागो एक अशा ट्वीटची मालिका सुरूच ठेवली.