होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नियम मोडून मोटार सायकलवर डबल सीट, रिक्षामध्ये 3 प्रवासी असेल आणि चारचाकीमध्ये तीन व्यक्ती असेल तर ठाणे आणि मुंबई पोलीस कारवाई करत आहे.
2/ 5


पोलीस कारवाई करत असल्यामुळे आज सकाळी आनंदनगर मुलुंड टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
3/ 5


ठाण्यात रविवारपासून कडक नियमाद्वारे नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात एकूण 1941 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी पंधराशे 1553 दुचाकी, 166 रिक्षा आणि 222 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.