या वर्षाच्या सुरूवातीपासूनच Covid 19 मुळे जगाच्या बर्याच देशांना मोठा फटका बसला. भारतात मार्च 2020 पासून कोरोनाची प्रकरणं समोर आली त्याची वाढती संख्या अजूनही सुरू आहे. कोरोनाचा कायमचा नाश व्हावा याच प्रतिक्षेत सध्या सरकार आणि जनता आहे. कोरोनामुळे मागिल 6 महिन्यांत खूप मोठे बदल झाले आहेत. कोरोनाला ओळखण्यासाठी बरीच लक्षणंही समोर आली. पण आता आर्थिक अडचणींमुळे लोक घराच्या बाहेर पडायला लागली आहे. पण मग मागील 6 महिन्यांत कोरोनाच्या लक्षणांमध्ये नेमका काय बदलले झाला आणि कोरोना रोग ओळखण्यासाठी कोणतं नवीन संशोधन समोर आलं याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. (AP Photo/Mahesh Kumar A.)
कोरोना विषाणूची देशभरात एकूण 34 लाखाहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. या साथीच्या रोगाचा आजार 6 महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. मार्चपासून भारतात कोरोनाची प्रकरणे येऊ लागली आणि आता जवळपास 35 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. आतापर्यंत 61 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत आणि 26 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत.
संशोधनात समोर आल्या प्रमाणे कोरोना संसर्ग आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीवर हल्ला करतो. तो मज्जासंस्थेवर परिणाम करतो. ज्यामुळे अशक्तपणा, अंग कठोर होणं, थरथरणं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे अर्धांगवायूचा धोकासुद्धा आहे.
कोरोनामुळे एन्सेफलायटीसही होऊ शकतो. याद्वारे मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.
खरंतर, कोरोना हा संपूर्ण श्वसनाचा रोग आहे. नवीन संशोधनात असं दिसून आलं आहे की, यामुळे मेंदूत समस्या उद्भवू शकते. संशोधनानुसार, करोनामुळे न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, श्वसनवाहिन्यांशी थेट संपर्क आल्याने कफ आणि शिंका येतात. हे म्हणजे कोरोनाही हवेमध्ये असू शकतो याचा पुरावा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. याचा अर्थ असा आहे की छोट्या एरॉल्समध्ये कोरोना जास्त काळ हवेत राहू शकतो.
कोरोनाची मुख्य लक्षणे म्हणजे घसा खवखवणे, थकवा, शरीरावर वेदना, सर्दी किंवा नाक वाहणं, अतिसार, चव कमी होणं आणि सुगंध कमी होणं, जळजळ होणं, मळमळ होणं.