मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठं विधान केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या स्थानवर लवकर जाईल असं भाकित त्यांनी राईझिंग इंडियाच्या वेळी बोलताना केलं.
भारताच्या अर्थव्यवस्थेत अलीकडच्या काळात बरीच सुधारणा झाली आहे. जी जगासमोर एक उदाहरण बनू शकते. ते म्हणाले की रेटिंग एजन्सीनुसार भारत 2027 मध्ये जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जीएसटी आणि आयकर संकलनात झालेली वाढ काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्पना न करण्यासारखी होती.
आता आपली वेळ आली आहे. राजनाथ सिंह यांनी रायझिंग इंडिया समिट 2023 मध्ये सांगितले की, हा रायझिंग इंडिया आहे.