कोरोनामुळे वाहतूक व्यवस्थेत आता अमुलाग्र बदल होणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी नवे कोच कसे राहतील त्याची माहिती दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन नव्या व्यवस्थेत करण्यात आलं आहे.
हे नवे कोच तयार करण्यासाठी प्रत्येक कोचला 7 ते 8 लाख रुपयांचा खर्च येतो. कुठल्याही गोष्टीसाठी हात लावण्याचं काम पडू नये अशी सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कोचमधल्या आणि बाहेरच्या हँडल्सवर तांब्याचं कोटिंग करण्यात आलं आहे. तांब्यावर व्हायरस कमी काळ जिवंत राहतो असं सांगितलं जातं.
तांब्यावर इतर कुठल्याही धातुंपेक्षा अल्पकाळ व्हायरस राहतो. त्याचबरोबर आयुर्वेदातही तांब्याचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे याचा वापर करण्यात आला आहे.
कोचमधली हवा शुद्ध राहण्यासाठी Air Purifier बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हवा ताजी आणि स्वच्छ राहण्यास मदत होईल.
कोचमधल्या सीट्स आणि इतर ठिकाणी जिथे स्पर्श होण्याची शक्यता असते अशा सर्व ठिकाणी टाइटेनियम डाय ऑक्साइडचं कोटिंग करण्यात आलं आहे. बॅक्टेरीयांसाठी हे कोटिंग हानीकारक आहे.