देशात Coronavirus चा प्रसार अजूनही वेगाने होतो आहे. पण त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर वाढलेला नाही. यासंदर्भात महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली.
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत Covid मृत्यू सर्वांत कमी झाले आहेत.
सध्या भारतात 5 लाख 28 हजार अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आणि बरे होणाऱ्या रुग्णांचा दर अॅक्टिव्ह पेशंटपेक्षा जवळपास दुप्पट आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह यायचं प्रमाण (Positivity rate)10 टक्क्यांहून कमी राखण्यात यश आलं आहे. ते 5 टक्क्यांवर आणायचं उद्दिष्ट आहे.