राज्य आणि केंद्राच्या संघर्षांत माझा बळी; पक्षप्रमुखांविरोधात बोलल्याने टार्गेट - आमदार प्रताप सरनाईक यांचं जाहीर वक्तव्य
बेहिशोबी मालमत्ता आणि MMRDA घोटाळा प्रकरणी ED च्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले आमदार प्रताप सरनाईक अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले आहेत. नेमके काय बोलले आहेत सरनाईक पाहा..
|
1/ 12
ED च्या चौकशा आणि कारवाईमुळे कुटुंबाला त्रास झाल्याने मी व्यथित झालो आहे.
2/ 12
मी मेहनत करुन मोठा झालोय घोटाळा करुन नाही
3/ 12
मधल्या काळात मी कौटुंबिक आणि मतदार संघातील कामात व्यग्र होतो.
4/ 12
आज माझ्यावर वेळ आलीये उद्या तुमच्यावर ही येऊ शकते.
5/ 12
माझ्यावर झालेल्या कारवाईमुळे माझे कौटुंबिक आणि आर्थिक नुकसान झाले
6/ 12
मला वाटलं नव्हतं एवढं मोठं संकट माझ्यावर येईल.
7/ 12
माझा दोष काही नव्हता, पण पक्ष प्रमुखांच्या विरोधात बोलले त्यांच्या विरोधात मी बोललो म्हणून मला टार्गेट केलं गेलं.
8/ 12
राज्य आणि केंद्राच्या संघर्षांत माझा बळी गेला आणखी किती बळी जातील देव जाणे
9/ 12
माझ्या पत्रानंतर CM सोबत माझी चर्चा झाली
10/ 12
युती व्हावी का या प्रश्नाला आता काही अर्थ नाही. आता खूप वेळ झाला.
11/ 12
मी अडचणीत आलोय हे माझे वाक्य आपसूक नव्हते, मला त्रास झाल्याने मी अडचणीत आलो, असं म्हटलो होतो.