प्रतिनिधी, पीयूष पाठक : महाराष्ट्रात सध्या फळ आणि भाज्यांची स्थिती अवकाळी पावसामुळे अत्यंत बिकट आहे. मात्र महाराष्ट्रातील कलिंगडाची सध्या राजस्थानमध्ये तुफान चर्चा होत आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे समजून घेऊया.
कलिंगड विक्रेते हकीमुद्दीन सांगतात की, १५ वर्षांपासून फळ बाजारात काम करत आहेत. त्यांच्या मते उत्तम महाराष्ट्रातील कलिंगड सर्वोत्तम आहेत. त्याची चवही चांगली आहे. ते लवकर खराब होत नाहीत.
हकीमुद्दीन सांगतात की कलिंगडाचेही जवळपास 70 प्रकार आहेत. सर्वोत्कृष्ट प्रकार बाहुबली म्हणून ओळखला जातो आणि त्याचा आकार 5 किलो ते 11 किलोपर्यंत आहे. दुसरीकडे राजस्थानचे टरबूज महागले आहे. ते 25 ते 30 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे.
रमजानमध्ये कलिंगड आणखी महाग होणार असल्याचं ते सांगतात. तेव्हा 40 रुपये किलो कलिंगडासाठी भाव येईल. त्यामुळे तुम्ही आता दर कमी आहेत तर कलिंगड खरेदी करू शकता असंही ते म्हणाले.