advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग, पाहा कशी केली शेतकऱ्यानं कमाल! Photos

दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग, पाहा कशी केली शेतकऱ्यानं कमाल! Photos

सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील प्रयोगशील शेतकरी काकासाहेब सावंत यांनी सफरचंदाची बाग फुलवली आहे.

  • -MIN READ

01
  जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

advertisement
02
पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तेव्हा राज्यभर जत तालुक्याची चर्चा झाली होती.

पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तेव्हा राज्यभर जत तालुक्याची चर्चा झाली होती.

advertisement
03
आता याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे. काश्मीरमधील नंदनवन समजले जाणारे सफरचंद जतमध्ये पिकवले आहे.

आता याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे. काश्मीरमधील नंदनवन समजले जाणारे सफरचंद जतमध्ये पिकवले आहे.

advertisement
04
 जत तालुक्याच्या अंतराळ येथील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड करण्याचे विचार सुरू होते.

जत तालुक्याच्या अंतराळ येथील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड करण्याचे विचार सुरू होते.

advertisement
05
सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान लागते. त्यामुळे त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.

सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान लागते. त्यामुळे त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.

advertisement
06
सावंत यांनी सुरुवातीला हिमाचल प्रदेशातून 'हरमन 99' या वाणाची 150 रोपे आणली. त्याची एक एकरात लागवड केली.

सावंत यांनी सुरुवातीला हिमाचल प्रदेशातून 'हरमन 99' या वाणाची 150 रोपे आणली. त्याची एक एकरात लागवड केली.

advertisement
07
 कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच मरून गेली. पण, योग्य ती काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली.

कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच मरून गेली. पण, योग्य ती काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली.

advertisement
08
या भागात पाणी कमी असल्याने ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी या रोपांना पाणी आणि काही आवश्यक खतांचे डोस दिले. तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला.

या भागात पाणी कमी असल्याने ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी या रोपांना पाणी आणि काही आवश्यक खतांचे डोस दिले. तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला.

advertisement
09
लागवड करून दोन वर्षे झाल्यानंतर आता प्रत्येक झाडाला 30 ते 40 सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100 ते 200 ग्रॅम इतके आहे.

लागवड करून दोन वर्षे झाल्यानंतर आता प्रत्येक झाडाला 30 ते 40 सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100 ते 200 ग्रॅम इतके आहे.

advertisement
10
 सध्याच्या बाजारभावाचा विचार करता एका झाडापासून त्यांना 600 ते 1600 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर संपूर्ण बागेतून 75 हजार ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

सध्याच्या बाजारभावाचा विचार करता एका झाडापासून त्यांना 600 ते 1600 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर संपूर्ण बागेतून 75 हजार ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

advertisement
11
 सावंत यांच्या बागेतील सफरचंदामध्ये आणि हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा एकसारखाच आहे.

सावंत यांच्या बागेतील सफरचंदामध्ये आणि हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा एकसारखाच आहे.

advertisement
12
 सावंत यांच्या या अभिनव प्रयोगामुळे जम्मू-काश्मिरप्रमाणेच आता सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग डौलाने डोलू लागली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

सावंत यांच्या या अभिनव प्रयोगामुळे जम्मू-काश्मिरप्रमाणेच आता सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग डौलाने डोलू लागली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/sangli/">सांगली जिल्ह्यातील</a> जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
    12

    दुष्काळी जतमध्ये काश्मिरच्या सफरचंदाची बाग, पाहा कशी केली शेतकऱ्यानं कमाल! Photos

    जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

    MORE
    GALLERIES