हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कडेगाव येथील मोहरम आज उत्साहात संपन्न झाला आहे. यानिमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटीचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली होती.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा त्याचे प्रतीक आहे. गेली 150 वर्षांपासून कडेगावमध्ये गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
' मोहरम ' हा मुस्लीम धर्मियांचा एक पवित्र सण मानला जातो मात्र कडेगाव येथील मोहरम सर्वधर्म समभावाच प्रतिक आहे. कडेगाव येथे मोहरमची 150 वर्षापासून परंपरा सुरू आहे.
या गावी 200 ते 250 फूट उंचीचे बांबूपासून ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे आणि पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात. ताबूत बांधताना चिकणमाती मध्ये सुत लपेटून ताबुतांचे मजले एकमेकावर बसवले जातात आणि ते करताना या मध्ये कुठेही गाठ दिली जात नाही हे ताबूत बांधकामाचे महत्वाचे वैशिष्टे आहे.
एक ताबूत उचलण्यासाठी ३०० ते ४०० लोक लागतात. गावातून सवाद्य मिरवणूक काढल्यानंतर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे ताबूत येतात. या ठिकाणी भेटीचा सोहळा पार पडतो.हा सोहळा पाहण्यासाठी, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी येतात.
कडेगावच्या राष्ट्रीय एकात्मतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू लोक मुस्लीम सण साजरे करतात तर मुस्लीम समाज हिंदूचे सारे सण साजरे करतात. कडेगाव मधील 14 ताबुतान पैकी निम्मे ताबूत हिंदू बांधव बसवतात ( हिंदूचे ताबूत 7 तर मुस्लीम बांधवांचे 7 ताबूत).
ताबूत प्रथम उचलण्याचा मान देशपांडे, कुलकर्णी, शेटे, वाळिंबे, सुतार, देशमुख यांना आहे तर हिंदुच्या दसरा वेळी आप्त पूजनाचा मान तसेच होळी पेटवण्याचा मन मुस्लीम बांधवांना आहे आणि ही परंपरा गेली 150 वर्षे नियमितपणे जोपासली जात आहे.
सुमारे हजारो वर्षांपूर्वी कराड इथं मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांची यात्रा भरत असे. ती पाहण्यासाठी कडेगावचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे गेले असता त्यांच्या त्या ठिकाणी योग्य तो सन्मान झाला नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली की कडेगावत कराड पेक्षाही मोठी गगनचुंबी ताबुतांची यात्रा भरविली जाऊ लागली.
हा सोहळा पाहण्यासाठी, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी येतात.