मूर्ती संवर्धन प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.गेल्या 45 दिवसांपासून देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होती.यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
देवीवरील 1100 किलो शेंदूराचे कवच काढण्यात आले असून त्यामुळे आता देवीचे मुळ रूप दिसत आहे. हे स्वरूप वेगळे असून देवीची मूर्ती अत्यंत मोहक दिसत आहे.
या मूर्तीचे मुळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक नागरिक आणि भाविकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते. त्यावेळी हे मनोहर रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
देवीचा शेंदूर काढण्याची सर्व प्रक्रिया ही पुरातत्व खात्याच्या नियमानुसार करण्यात आली. यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला नाही.
येत्या 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे. दररोज शेकडो भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येत असतात. आता देवीचं मुळरूप समोर आल्याने अनेक भक्तांना दर्शनाची ओढ लागली आहे.