पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. चूल आणि मूल ह्या समिकरणाला छेद देत आता महिला उंबऱ्याच्या बाहेर पडल्या आहेत.
2/ 8
स्त्री-पुरुष विषमतेची दरी दूर व्हावी आणि समाजात स्त्रियांनादेखील पुरुषांप्रमाणे भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी काही महिला संघटना कार्यरत आहेत.
3/ 8
नागपूरमधील सहयोग ट्रस्ट आणि स्वराज फाउंडेशनने 'नाईट टी विथ आजादी' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले.
4/ 8
नागपूरच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी आणि इतर सर्वसामान्य महिला शंकरनगर चौकात एकत्र आल्या आणि रात्री 11.30 वा. चहाच्या टपरीवर चहाचा आनंद घेत चर्चा केली.
5/ 8
पुरुषांप्रमाणे स्त्रियांनी देखील भयमुक्त जीवन जगून समाजात वावरावे हा या अभियानामागील उद्देश आहे.
6/ 8
या उपक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही सहभागी झाल्या होत्या.
7/ 8
हा अनोखा उपक्रम ह्यूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या प्रमुख ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर आणि सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी यांनी राबविला.
8/ 8
नागपुरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील महिला 'नाईट टी विथ आजादी' उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.