Vastu Tips : तुमच्या घरातील 'नको त्या वस्तू' ठरतायेत तुमच्या अपयशाचं कारण
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार (According to Vaastu Shastra) काही गोष्टी घरात असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) वाढते.
|
1/ 9
बर्याच वेळा असं घडतं कीं आपण आपलं काम 100% चांगलं केलं तरी आपल्याला आपल्या परिश्रमाचं पूर्ण फळ मिळत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी लहानलहान गोष्टींचे अडथळे येऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
2/ 9
वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरात असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढून, कौटुंबिक कलह, कर्जाची वाढ, आर्थिक संकटं अशा गोष्टींचा सामना करावा लागतो.
3/ 9
अशा परिस्थितीत अडकलेल्या माणसाला काहीच सुचत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही अडकले असाल तर आपल्या घरातल्या वस्तूंवर नजर फिरवा.
4/ 9
घरात असलेल्या काही निरुपयोगी गोष्टी घरात नकारात्मकता पसरवत असतात. जर काही कामात सतत प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नसेल आणि तुमच्या मनात निराशा वाढली असेल तर तुमच्या घरात वास्तू दोषही असू शकतो.
5/ 9
बर्याचदा आपण आजारी असताना बरीच औषधं आणतो पण बरं झाल्यानंतरही ती औषधं आपल्या घरात राहतात. जे टाळलं पाहिजे. निरुपयोगी औषधं रोग वाढवतात. म्हणून निरुपयोगी औषधं घरात ठेवू नका.
6/ 9
वास्तुशास्त्रानुसार बुडणाऱ्या जहाजाचं चित्रं आपल्या घरात ठेवू नये. ते निराशेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच घराची सजावट करताना अशी चित्र लावू नका. असे फोटो किंवा पेंटिंग मनात नकारात्मक विचार वाढवू शकतात.
7/ 9
ज्या घरात मोडलेल्या मूर्ती आणि वस्तू ठेवलेल्या असतील तिथे सुख-शांती नांदत नाही. वास्तुशास्त्राव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रातही याला अशुभ मानलं जातं. यामुळे घरातील सदस्यांवर काठीण प्रसंग ओढावतात.
8/ 9
वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. घरात घाण असल्यास घराकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. ज्या घरात घाण राहत आहे तिथे लक्ष्मीची कृपा होत नाही.
9/ 9
वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवू नये. घरात जेवढा जास्त प्रकाश असेल तितकी सकारात्मकता घरात येते. संध्याकाळी घरात कोणत्याही भागात अंधार असू नये.