उन्हाळ्यात शरीरात डिहाइड्रेशन होऊ लागतं. त्यामुळे शरीरात कमजोरी, अशक्तपणा येऊ शकतो. हे अगोदरच टाळण्यासाठी लिंबूपाणी हे एक उत्तम पेय आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, तसेच उन्हाळा आणि उष्माघातापासून आपला बचाव होतो.