‘या’ गोष्टींकडे लक्ष असू द्या! लगेच पकडा जोडीदाराने केलेली फसवणूक
प्रेम विवाह असो की अरेंज मॅरेज एकमेकांशी प्रामाणिक असल्याशिवाय ते नातं (Relation) जन्मभर टिकू शकत नाही. विश्वासावर लग्नाचं (Trust On Partner) नातं टिकतं. पण, हा विश्वास तूटायला वेळ लागत नाही.
|
1/ 10
एकदा झालेली फसवणूक जन्मभराचा कडूपणा निर्माण करते. त्यामुळे असं नातं ओझ ठरतं.
2/ 10
फसवणूक झाल्यानंतर पतीपत्नीच्या नात्यात तोच विश्वास कमवायला वेळ लागतो किंवा तो विश्वास मिळवताही येत नाही. जोडीदाराने शारीरिक किंवा मानसिक फसवणूक केली तरी, मानिकदृष्ट्या फार खच्चीकरण होतं.
3/ 10
मनात येत एकच प्रश्न येतो की जोडीदाराने मला का फसवलं ? अशा परिस्थितीत ज्याची फसवणूक झाली आहे तो स्वत:ला जास्त त्रास करतो. एकमेकांवर प्रेम करणारे अशी फसवणूक का करतात.
4/ 10
अशा प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की,बऱ्याचदा जोडीदार रागाच्याभरात असं वागतो. जोडीदार आपल्याला महत्व देत नाही, गरजा पूर्ण करत नाही किंवा फसवणूक करतो ही, भावना मनात घर करुन राहिलेली असते.
5/ 10
कधीकधी काळाबरोबर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होऊ लागतं आणि जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाही.
6/ 10
एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती पुन्हा प्रेमात पडू शकते. आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक करतो हे लक्षात येऊनही ताबा राहत नाही.
7/ 10
बिझी लाईफमध्ये जोडीदारांना एकमेकांसाठी वेळ मिळवणं कठीण झालंय. कामाच्या व्यापात बहुतेक वेळा जोडीदाराला विसरून जातो आणि त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागतो. यामुळे जोडीदार आपली काळजी घेत नाही ही भावना मनात घर करते.
8/ 10
त्यामुळे जोडीदारापेक्षा इतर कोणत्याही व्यक्तीकडून जास्त काळजी आणि प्रेम मिळालं तर, त्याच्याविषयी आकर्षण वाढू लागतं आणि परिस्थिती फसवणूकीवर येते.
9/ 10
चांगल्या नातेसंबंधात फिजिकल इंटमसी देखील आवश्यक आहे. कधीकधी वाढलेलं वय,जबाबदाऱ्या आणि प्रेम कमी झाल्यामुळे शारीरिक जवळीक कमी होते.
10/ 10
यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.