advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / संधी सोडू नका, भरपूर खा! फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या

संधी सोडू नका, भरपूर खा! फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या

आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहे. पण यातल्या अनेक आपल्याला ओळखूच येत नाहीत. त्यामुळे त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहीत नसतं. पाहा एक झलक

01
पावसाला सुरुवात झाली की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. आदिवासी महिला भर पावसात या भाज्या घेऊन बाजारात येतात. पण, आपल्याला या भाज्यांची ओळख नसल्याने त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहिती नसतं.

पावसाला सुरुवात झाली की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. आदिवासी महिला भर पावसात या भाज्या घेऊन बाजारात येतात. पण, आपल्याला या भाज्यांची ओळख नसल्याने त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहिती नसतं.

advertisement
02
काही रानभाज्या किंवा जंगली भाज्या केवळ पावसाळ्यात मिळतात. या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम,पोटॅशियम,कॅल्शियम असतं.

काही रानभाज्या किंवा जंगली भाज्या केवळ पावसाळ्यात मिळतात. या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम,पोटॅशियम,कॅल्शियम असतं.

advertisement
03
शेवळं-ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला मिळते. ही भाजी घशाला खवखवते त्यामुळे विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. पण, यात मूत्राशयाचे आजार बरे करण्याची ताकद असते. शेवळांची भाजी किंवा वडीही बनवतात.

शेवळं-ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला मिळते. ही भाजी घशाला खवखवते त्यामुळे विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. पण, यात मूत्राशयाचे आजार बरे करण्याची ताकद असते. शेवळांची भाजी किंवा वडीही बनवतात.

advertisement
04
टाकळा-टाकळ्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो.तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजी प्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होतं शिवाय त्वचारोग होण्याचा धोका कमी असतो.

टाकळा-टाकळ्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो.तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजी प्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होतं शिवाय त्वचारोग होण्याचा धोका कमी असतो.

advertisement
05
करटोली-थोडीशी कडवट चवीची ही भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होतं आणि मुळव्याधासारखा त्रासही कमी करते. थोडी काटेरी कारल्या सारखी दिसते.

करटोली-थोडीशी कडवट चवीची ही भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होतं आणि मुळव्याधासारखा त्रासही कमी करते. थोडी काटेरी कारल्या सारखी दिसते.

advertisement
06
कुर्डू-पावसाळ्यात मिळणारी ही भाजी गावाकडच्या भागात अवडीने खाल्ली जाते. युरीनच्या समस्या कमी करते. जुनाट खोकला,कफ कमी करू शकते. ही भाजी आपल्या पालेभाज्यांप्रमाणेच बनवतात.

कुर्डू-पावसाळ्यात मिळणारी ही भाजी गावाकडच्या भागात अवडीने खाल्ली जाते. युरीनच्या समस्या कमी करते. जुनाट खोकला,कफ कमी करू शकते. ही भाजी आपल्या पालेभाज्यांप्रमाणेच बनवतात.

advertisement
07
कोरळा-या भाजीला फोडशी,कुळी किंवा कुबळी म्हटलं जातं. लांबट पातीसारखी ही भाजी असते. याची भाजी, थालीपिठं बनवता. अतिशय चवदार असते.

कोरळा-या भाजीला फोडशी,कुळी किंवा कुबळी म्हटलं जातं. लांबट पातीसारखी ही भाजी असते. याची भाजी, थालीपिठं बनवता. अतिशय चवदार असते.

advertisement
08
तादूंळजा किंवा रानमाठ-जसा चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते. थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.

तादूंळजा किंवा रानमाठ-जसा चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते. थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.

advertisement
09
पावटा-हा भाजी बाजारात मिळत नाही पण, घरीच उगवता येते. त्यासाठी गावठी वाल भिजत घालावेत, त्यांना मोड आल्यावर पानं फुटेपर्यंत तसेच ठेवावेत. अगदी हिरवी पानं आली की मेथीच्या भाजी प्रमाणे बनवावेत. पावसाळ्यातच असे मोड येतात. याला वालाचे स्प्राऊट म्हणता येईल.

पावटा-हा भाजी बाजारात मिळत नाही पण, घरीच उगवता येते. त्यासाठी गावठी वाल भिजत घालावेत, त्यांना मोड आल्यावर पानं फुटेपर्यंत तसेच ठेवावेत. अगदी हिरवी पानं आली की मेथीच्या भाजी प्रमाणे बनवावेत. पावसाळ्यातच असे मोड येतात. याला वालाचे स्प्राऊट म्हणता येईल.

advertisement
10
आळू किंवा तेरी-बारामाही आळूपेक्षा या भाजीची पानं थोडी पातळ असतात. या भाजीत लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. आळूची वडी किंवा फदफद आवडीने खाल्ल जातं.

आळू किंवा तेरी-बारामाही आळूपेक्षा या भाजीची पानं थोडी पातळ असतात. या भाजीत लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. आळूची वडी किंवा फदफद आवडीने खाल्ल जातं.

advertisement
11
उळशीचा मोहोर-साधराणपणे ऑगस्ट महिन्यात उळशीचा मोहोर येतो. या मोहराची भाजी बनवतात. अगदी माशाच्या अंड्यासारखी ही भाजी दिसते म्हणून तिला गाबूलीची भाजीही म्हणतात.

उळशीचा मोहोर-साधराणपणे ऑगस्ट महिन्यात उळशीचा मोहोर येतो. या मोहराची भाजी बनवतात. अगदी माशाच्या अंड्यासारखी ही भाजी दिसते म्हणून तिला गाबूलीची भाजीही म्हणतात.

advertisement
12
रान कंद- पावसाळ्यात मिळणारे करांदे आवडीने खाल्ले जातात. कापलेले करांदे राखेत घोळवून पळसाच्या पानात शिजवतात. शिवाय पाऊस कमी झाला की, रताळे, करांदे,कोळू,चाई,कणंक यात व्हिटॅमीन ए,बी 5,बी 6,थायमिन, नायसिन, रिबोफलाविन, कॅरोनाईट्स असतं. हे घटक कॅन्सर सारख्या आजाराला दूर ठेवातात.

रान कंद- पावसाळ्यात मिळणारे करांदे आवडीने खाल्ले जातात. कापलेले करांदे राखेत घोळवून पळसाच्या पानात शिजवतात. शिवाय पाऊस कमी झाला की, रताळे, करांदे,कोळू,चाई,कणंक यात व्हिटॅमीन ए,बी 5,बी 6,थायमिन, नायसिन, रिबोफलाविन, कॅरोनाईट्स असतं. हे घटक कॅन्सर सारख्या आजाराला दूर ठेवातात.

  • FIRST PUBLISHED :
  • पावसाला सुरुवात झाली की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. आदिवासी महिला भर पावसात या भाज्या घेऊन बाजारात येतात. पण, आपल्याला या भाज्यांची ओळख नसल्याने त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहिती नसतं.
    12

    संधी सोडू नका, भरपूर खा! फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या

    पावसाला सुरुवात झाली की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. आदिवासी महिला भर पावसात या भाज्या घेऊन बाजारात येतात. पण, आपल्याला या भाज्यांची ओळख नसल्याने त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहिती नसतं.

    MORE
    GALLERIES