आपलं वजन वाढायला लागलं तर किती टेन्शन येत. पावसाळ्यात तर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जास्तच तेलकट पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी पावसाळ्यातं काही छोटे बदल करुन पाहा.
वजन नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. यामुळे मेटाबॉलिजम सुधारेल आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय कमी कॅलरी असलेल्या कुकीजही घेऊ शकता.
सकाळचा नाश्ता हेल्दी असावा पण, जास्त कॅलरींनी भरलेला नसावा. सकाळी कमी लो फॅट दूध घ्या आणि त्याबरोबर मोड आलेली कडधान्य खा. कडधान्य वाफवूही खाऊ शकता.
पावसाळ्यात सिजनल फूड खावं. पण, तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या वाफवलेले किंवा कोशिंबीर बनवून खा किंवा जेवण करताना कमी तेलाचा वापरा करा.
पावसाळ्यात नेहमी रात्रीचं जेवण हलकचं घ्यावं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप,मूगाची डाळ,विविध भाज्यांचा समावेश करू शकता. तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा ओट्स खा. पावसात,रात्रीचं जेवण जास्त उशीर घेऊ नका. जेवण जेवढं उशीर घ्याल तितकचं पोट बाहेर येईल.
सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले बदाम खाल्ले तर, शरीर निरोगी रहील आणि वजन वाढणार नाही. भिजवलेले बदाम खाल्ल्याने चरबी वाढवत नाहीत आणि आरोग्यही चांगलं राहतं.
कधीही भूक लागल्याने फास्ट फूड खायची इच्छा झाली तर, केळी खा. केळ्यामध्ये असलेले पदार्थ फास्ट फूडची क्रेविंग कमी करतात. याशिवाय पावसाळ्यात येणारी सगळी फळं खा.