झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, उच्च रक्तदाब हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर त्रास देतो. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, तसेच यावर नियंत्रण न ठेवल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे मेंदूला धोका असतो, रक्तस्त्राव, पक्षाघातही होऊ शकतो. काही फळांचे सेवन करून रक्तदाब कसा नियंत्रित करू शकतो, याविषयी जाणून घेणार आहोत.
1. केळी केळी हे बारमाही फळ असून ते अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. केळ्यामध्ये आढळणारे पोषक तत्व रक्तदाबावर रामबाण उपाय म्हणून काम करतात, दररोज केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासही मदत होते.
2. किवी - किवी हे खूप पौष्टिक फळ आहे, त्यात अनेक पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत राहते, याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे शरीराला कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद मिळते.
3. आंबा - उन्हाळ्यात मिळणारे हे फळ केवळ चवीसाठीच नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. विशेष म्हणजे ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आंबा खाणे खूप फायदेशीर आहे
आंब्यात आढळणारे बीटा कॅरोटीन आणि फायबर हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, हे दोन घटक बीपी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. जे आरोग्यासाठी चांगले आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)